Tuesday 26 November 2013

बिन जातीचे व्हा!



''काळ बदलला की ताळ (ताल) बदलतो...'' काँग्रेसच्या बाबतीत ही म्हण उत्तर प्रदेशात खरी ठरू पाहत आहे. जातीनिरपेक्षता हा काँग्रेसचा आणि काँग्रेस नेतृत्वाचा खरा चेहरा आहे. हा चेहरा एकेकाळी काँग्रेसची खरी शक्ती होती (आजही आहे.). उत्तर प्रदेशात मात्र जातीनिरपेक्षा चेहरा काँग्रेसला जाचक ठरू लागला आहे, असे दिसते.  २०१२ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीतील यशापयशाचा आढावा घेण्याचे काम सध्या सर्वच पक्षांत सुरू आहे. तसेच ते काँग्रेसमध्येही सुरू आहे. काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी अर्थात ‘आरजी' यांच्या नेतृत्वाखाली अशीच एक आढावा बैठक नुकतीच घेण्यात आली. या बैठकीत बहुतांश नेत्यांनी एकच मुद्दा मांडला, की काँग्रेसला जातीय चेहरा नसल्यामुळे उत्तर प्रदेशात हार पत्करावी लागली. त्यावर राहुल गांधी म्हणाले की, चेहरा नाही कसा? मी ब्राह्मण आहे आणि काँग्रेचा जनरल सेक्रेटरी आहे. (आरजी यांचे मूळ वाक्य असे : (I am a Brahmin and general secretary of the party.)

जाती-धर्म पणाला लावण्याचे मूळ पाप भाजपाचे

आरजी यांचे हे वक्तव्य अधिकृत नाही. झिरपत आलेल्या माहितीवरून प्रसार माध्यमांनी ते प्रसिद्ध केले आहे. आरजींचे हे वक्तव्य खरे मानायचे की खोटे हा प्रश्न आहे. येथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, बैठकीत आरजी काय बोलले या पेक्षा काँग्रेसला कोणता संदेश बाहेर पाठवायचा, हे महत्वाचे ठरते. काँग्रेसकडून अधिकृतरित्या या कथित वक्तव्याचा इन्कार आलेला नाही. याचा सोपा अर्थ असा आहे की, प्रसारमाध्यमांत ज्या बातम्या आल्या त्याला काँग्रेसचा आक्षेप नाही. काँग्रेसला अपेक्षित असाच संदेश बाहेर आला आहे. आरजी यांच्या वक्तव्यावर भाजपाने अपेक्षेप्रमाणे आकांडतांडव केले. भाजपाचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी काँग्रेसला दुषणे दिली. (जावडेकर यांची मूळ टीका अशी : Now this is crossing all limits that Rahul Gandhi has started informing what his caste is...That he is a Brahmin. Congress has lost all patience after losing the mandate in Uttar Pradesh elections.) वस्तुत: भारतीय राजकारणात जाती आणि धर्म पणाला लावणयचे मूळ पाप भाजपाचेच आहे. राजकारणात गैरसोयीच्या गोष्टी विसरायच्या असतात. जावडेकर भाजपाचे पाप विसरले, ते याच न्यायाने! हिंदुत्ववाद आणि राममंदिराचे आंदोलन पेटवून भाजपाने एकेकाळी उत्तर प्रदेशात एकहाती सत्ता उपभोगली आहे. भाजपाने जे पेरलेल्या विकृतीचा विकास उत्तर प्रदेशात आता दिसू लागला आहे. भाजपाच्या  पे-याची ही विकसित आवृत्ती आता खुद्द भाजपाच्या हातूनही निसटली आहे. काँग्रेसप्रमाणेच भाजपालाही उत्तर प्रदेशात दारुण पराभव पाहावा लागला आहे.

अपवित्र आणि विषारी सत्य 

काँग्रेसच नव्हे, तर इतर सर्व पक्ष आणि प्रसार माध्यमे २०१२ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे विश्लेषण जातींच्या चौकटीतच करीत आहेत. मायावती दलित आहेत, म्हणून दलित समाज त्यांच्या सोबत आहे. सतीशचंद्र मिश्रा हे ब्राह्मणांचे नेते मायावतींसोबत आहेत, म्हणून ब्राह्मण समाज मायावतींसोबत आहे. मुलायमसिंग हे जातीने यादव आहेत, म्हणून यादव समाज त्यांच्यासोबत आहे. आजमखान यांच्यासारखे मान्यताप्राप्त मुस्लिम नेते सपासोबत आहेत, म्हणून मुस्लिम समाज सपासोबत आहे. अजित सिंग जाट आहेत, म्हणून जाट समाज त्यांच्या सोबत आहे. इ. स्वरूपाची अत्यंत साधी-सोपी समीकरणे मांडली जात आहेत. दुर्दैवाने ती सत्य आहेत. सत्य हे नेहमीच पवित्र असते असे नव्हते. सत्य हे अपवित्र आणि विषारीही असू शकते. उत्तर प्रदेशात ते दिसले.  काँग्रेसच्या नेत्यांनी आरजी यांच्या बैठकीत ते सांगितले. सगळ्या जाती आपापल्या जातीच्या नेत्यांच्या मागे गेल्या आहेत. काँग्रेसच्या मागे यायला जातीच उरलेल्या नाही!

जाती लाभ देतात अन् मर्यादाही

अपवित्र असले, विषारी असले, म्हणून सत्य नाकारता येत नाही. भारतीय राजकारणच नव्हे तर समाजकारण आणि धर्मकारण अशा सर्वच व्यवस्था प्राचीन काळापासून जातींभोवती फिरत राहिल्या आहेत. जातींचे फायदे आहेत. तसेच तोटेही आहेत. मोठ्या समाज घटकांतून आलेल्या राजकीय आणि धार्मिक नेत्यांना चटकन अनुयायी  मिळतात. झटपट यश मिळते. तथापि, असे नेतृत्व जातीची आणि प्रदेशाची चौकट मोडू शकत नाही. मुलायम सिंग, लालूप्रसाद, नितिशकुमार, शरद यादव, शरद पवार, मायावती, ममता बॅनर्जी, जयललिता, करुणानिधी, फारुख अब्दुल्ला, अजित सिंग, पी. ए. संगमा, एच. डी. देवेगौडा हे नेते याचे उत्तम उदाहरण आहेत. ही माणसे खरोखरच वजनदार आहेत. या नेत्यांनी आपापल्या प्रदेशात राजकीय घराणी जन्माला घातली आहेत. तथापि, हे नेते आणि त्यांची घराणी प्रदेश आणि जातीच्या भिंती तोडून "अखिल भारतीय"  होऊ शकली नाहीत. होऊ शकणार नाहीत. 


अखिल भारतीय होण्याची ताकद असलेले एकच घराणे या देशात आहे. ते म्हणजे "गांधी-नेहरू" घराणे. या घराण्याला ही ताकद त्यांच्या बिनजातीच्या आणि बिनधर्माच्या चेह-याने दिली आहे. या घराण्याला कोणतीच जात राहिलेली  नाही. नेहरू हे या घराण्याचे मूळ पुरूष. ते काश्मिरी ब्राह्मण होते. त्यांची कन्या इंदिरा गांधी यांनी पारशी फिरोज गांधी यांच्याशी विवाह केला. इंदिरा गांधींचे थोरले पुत्र राजीव गांधी यांच्या पत्नी सोनिया गांधी इटालीच्या, कॅथालिक ख्रिश्चन आहेत. धाकटे पुत्र संजय गांधी यांच्या पत्नी मेनका गांधी या शीख समाजातील आहेत. राजीव गांधी यांची कन्या प्रियंका गांधी यांचा विवाह भारतीय वंशाचे ख्रिश्चन धर्मीय रॉबर्ट वधेरा यांच्याशी झाला आहे. अशा परिस्थितीत गांधी-नेहरू घराण्याची कोणती जात गृहीत धरायची? कुठल्याही जातीचा आणि धर्माचा आणि वंशाचा चेहरा नसल्यामुळे नेहरू-गांधी घराणे सर्व जाती-धर्मांसाठी स्वीकारार्ह ठरले. त्यांचा काँग्रेस पक्ष राष्ट्रीय पक्ष ठरला. 

ज्या बिनजातीच्या चेह-याने काँग्रेसला अखिल भारतीय ओळख दिली, तोच चेहरा आता काँग्रेसला उत्तर प्रदेशात अडचणीचा वाटू लागला आहे असे दिसते. १९४७ ते २०१२ या ६५ वर्षांच्या काळात आपल्या समाज व्यवस्थेने केलेली ही प्रगती समजायची का? 

आपली समाज रचना खरोखरच अद्भूत आहे. गुंतागुंतीची आहे. ती दोन पातळ्यांवर काम करते. एका पातळीवर ती जाती आणि धर्मांच्या बंदिस्त भिंतीत वावरते. जातींचे लाभ व्यक्तींना देते. त्याचवेळी दुस-या बाजून ती या  भिंती  तोडूही पाहते. त्यासाठी अधिक मोठे लाभ देते. गुरुत्वाकर्षणासारखे  हे आहे. गतीमुळे गृहगोलांच्या गाभ्यात गुरुत्वाकर्षण तयार होते. ते गृहाला आत खेचू पाहते. हीच गती गृहागोलाच्या बाह्य परिघाला बाहेर फेकू पाहते. "मोठा आवाका प्राप्त करण्यासाठी बिनजातीचे व्हा", असा संदेश आपली समाज व्यवस्था देते. 

थोडक्या लाभासाठी काँग्रेसला आपला अखिल भारतीय चेहरा गमावणे परवडणार नाही. हे जसे काँग्रेच्या हिताचे नाही, तसेच देशाच्याही हिताचे नाही. अखिल भारतीय चेहरा असलेला एकच पक्ष आणि एकच घराणे या देशात आहे, हे लक्षात ठेवले पाहिजे. 

...................................................................................
आरजी यांच्या वक्तव्या विषयीची मूळ लिन्क :

-सूर्यकांत पळसकर  

Tuesday 12 November 2013

टाटा मोटर्स की पश्चिम बंगाल में लौटने की इच्छा

सिंगूर की जमीन पर बने रहना चाहती है कंपनी 

टाटा मोटर्स ने आज उच्चतम न्यायालय को सूचित किया कि वह पश्चिम बंगाल में सिंगूर में उसके कारखाने के लिए आबंटित  एकड़ जमीन अपने पास रखना चाहती है और नैनो परियोजना के अगले विस्तार के दौर में वह प्रदेश में लौटना चाहती है.
     न्यायमूर्ति एच एल दत्तू और न्यायमूर्ति रंजना प्रकाश देसाई की खंडपीठ के समख टाटा मोटर्स की ओर से वरिष्ठ अधिवक्ता हरीश साल्वे ने कहा, ‘‘मुझे सर्वोच्च स्तर से यह कहने का निर्देश मिला है कि हम वहां :पश्चिम बंगालः लौटने के इच्छुक हैं।ङ्कङ्क साल्वे ने यह बात इस परियोजना को गुजरात स्थानांतरित करने के बाद की स्थिति में  सिंगूर में आबंटित भूमि के बारे में कंपनी का दृष्टिकोण स्पष्ट करने संबंधी शीर्ष अदालत के सवाल के जवाब में यह बात कही। 
       न्यायाधीशों ने पूछा था, ‘‘सिंगूर में जमीन कार विनिर्माण परियोजना के लिये भूमि प्राप्त की गयी थी। अब यह मकसद रहा नहीं क्योंकि आप पहले ही वहां से अन्यत्र चले गये हैं। आप अब यह नहीं कह सकते कि इस भूमि में आपकी अभी भी दिलचस्पी है.ङ्कङ्क        न्यायाधीशों का कहना था, ‘‘यह भूमि किसानों को वापस दी जानी चाहिए थी और हम पश्चिम बंगाल सरकार को इस मसले पर हलफनामा दाखिल करने के लिये कह सकते हैं कि भूमि अधिग्रहण के वक्त जिस राशि का आपने भुगतान किया था, वह आपको लौटा दी जाये।ङ्कङ्क        टाटा मोटर्स के जवाब पर पश्चिम बंगाल सरकार के वकील ने कहा कि वह यह जमीन किसानों को लौटाने का अनुरोध करेंगे।
        इन दलीलों का संज्ञान लेते हुये न्यायालय ने कहा कि चूंकि कंपनी भूमि अपने पास रखना चाहती है, इसलिए उसे राज्य सरकार की याचिका का गुणदोष के आधार पर निर्णय करना होगा। न्यायालय ने इसके साथ ही इस मामले की सुनवाई अगले साल अप्रैल के लिये स्थगित कर दी।
        न्यायालय सिंगूर भूमि पुनर्वास और विकास कानून, ० निरस्त करने के कलकत्ता उच्च न्यायालय के पिछले साल  जून के निर्णय के खिलाफ पश्चिम बंगाल  सरकार की याचिका पर सुनवाई कर रहा है. इस कानून के तहत टाटा मोटर्स को दी गयी ०० एकड़ जमीन वापस लेने का अधिकार सरकार को दिया गया था।